Share

विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सध्या नामांतराचा विषय फारच जोर धरत आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, सेना यांच्यात नामांतराचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्यातच आता शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे विमानतळ असे नाव देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, या विषयी भाजपच्या नेते मंडळींनी केंद्रीय मंत्रांची देखील भेट घेतल्याचे आ. अतुल सावे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले. त्याबरोबर थोरतांचाही चांगलाच समाचार घेतला.

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या मुद्द्याला मनपाने वेगवेगळे फलक लावून राजकीयदृष्ट्या चांगलेच खत पाणी घातले. त्यामुळे हा विषय स्थानिक पातळीवरतून थेट राज्यांच्या मंत्र्यांपर्यंत पोहचला. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने हा मुद्दा चांगलाच धरला. तर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला. त्यावर थोरात यांनी सेना भाजप वर टीकास्त्र सोडले होते.

त्यावर आ. अतुल सावे यांनी शहरासोबत विमानतळाचे देखील नामांतर छत्रपती संभाजी राजे विमानतळ ठेवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याची माहिती देत. शहरातील वरिष्ठ तसेच काही नेते मंडळीनी विमानतळाच्या नामांतरासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री यांनी भेट देखील घेऊन चर्चा केली आहे. यावर लवकरच कळणार असल्याचे सावे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!