🕒 1 min read
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगद्याला ६ हजार कोटीचा खर्च असून हा बोगदा खांन्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता या कामी व्यक्तीगत लक्ष द्यावे अशी विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांच्याकडे केली आहे. संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदनही या वेळी कांत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासुन राष्ट्रिय महामार्ग ५२-(२११) या बाबत संसदेत, लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित करुन हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी बोगद्याचाही विकास आराखडा तयार करण्यात आला. आता लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचेही खैरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांची खैरे यांनी भेट घेतली. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी विविध मुद्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अॅड. आशुतोष डंख, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
