Share

आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’

Published On: 

🕒 1 min read

गडचिरोली : आरक्षण हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च घालत बसू नका. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा. हे नेते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरत आहेत, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी मांडली आहे. एका पत्रकातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांनी आपली भूमिका छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे की, मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकला नाही. काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसे बदल मराठा समाजातही होत आहे. स्वत:च्या मेहनतीवर जगणारा शेतकरी समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रात नमुद आहे.

सर्वच पक्षांच्या नेत्यांची नियत खोटी आहे. ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाही. त्यांचे गणित दोन बाबींवर अवलंबून असते. मराठा समाज त्यांना केवळ वोट बँकेसाठी पाहिजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर जास्तीत जास्त काळ मराठा समाजातून आलेले नेते मंडळी राहिली आहे. असे असतानाही मराठा समाजाची अशी अधोगती का झाली? असा प्रश्न नक्षल्यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!