नाशिक : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून बराच वाद सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी स्वत:चे नाव या विमानतळाला देण्यास नकार दिला असता. जे. आर. डी. टाटा यांचे नाव त्यांनी सुचवले असते. शिवसेनाप्रमुखांबरोबरच दी. बा. पाटील यांच्या नावालाही आमचा पाठिंबा आहेच; परंतु नामकरणाचा मुद्दा एकत्र बसून सोडवला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई विमानतळाच्या वादावरून त्यांनी शिवसेनेला आस्तेकदमचा सल्ला दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव देण्यास नकार दिला असता, असेही भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कोरोना बळींच्या आकडेवारीत घोळ आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या लपवली गेली की, यात काही घोळ आहे, याचा शोध घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. यात नेमका काय घोळ आहे, नेमकी चूक कोणाची याची माहिती घेणार असल्याचे भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वाघ पंजाही मारू शकतो
मोदींच्या भेटीबाबत शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याच्या प्रश्नाबाबत भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. त्यामुळे जमवून घ्यावेच लागते; परंतु मैत्री करायची की नाही, हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो, असा टोला भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
- ‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
