🕒 1 min read
उस्मानाबाद : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने समान वाटा देणे बंधनकारक असताना सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने एका लाखाचीही तरतूद केली नसल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, चंद्रकांत कणे, आनंद कंदले, विनोद गंगणे, प्रकाश मगर, गुलचंद व्यवहारे उपस्थित होते.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग पंतप्रधानांनी मंजूर केला आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारला समान निधी द्यायचा आहे. मात्र विधानसभेत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या रेल्वे मार्गाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने निधीची तरतूद करण्याची गरज नसल्याचे उत्तर राज्याचा परिवहनमंत्र्यांनी दिले. हा युक्तिवाद चुकीचा असल्याचे आमदार राणा पाटील म्हणाले. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाने ५० टक्के वाटा भरावा, असे यावेळी आमदार राणा पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा

