मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाबत होत असलेल्या कामाची तसेच त्यासाठी राज्य सरकारची प्रशंसा केली, अशा बातम्या आल्या होत्या. या पेरलेल्या बातम्या असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यात आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणलो की, ‘मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.’
मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.@BJP4Maharashtra pic.twitter.com/otaJjRygh5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 9, 2021
कोरोना स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मात्र, या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील कामाचे कौतूक केले असल्याचे वृत्त आले होते. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलीय. पंतप्रधान कार्यालयाने असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अवघ्या ‘दिडशे रुपया’त पार पडलं ‘या’ अभिनेत्याचं लग्न
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे : शिंदे
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरु आहे – गावीत


