Share

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Published On: 

औरंगाबाद : शासनदरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील तब्बल साडेतीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यांबाबत तसेच आंदोलनाच्या माहितीचे निवेदन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा संघटनेने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा कंत्राटदाराकडे सोपवण्याचे तसेच भविष्यात रिक्त पदे न भरता ती पदे व्यपगत करण्याचे व चतुर्थश्रेणी संवर्ग संपवण्याचे शासनाचे धोरण असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मागूनही शासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 ते 29 जानेवारीदरम्यान राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!