Share

IND vs SL: भारताचा श्रीलंका विरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; विराट कोहलीसाठी ऐतिहासिक दिवस

Published On: 

मुंबई: भारतीय संघाचा श्रीलंका विरुद्ध कसोटी सामना आजपासून मोहाली येथे सुरु होणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्यावर भारतीय संघाने त्यांना टी २० मालिकेत आधीच क्लीन स्वीप केले आहे. मात्र आज भारतीय संघासाठी एक विशेष दिवस ठरणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) त्याचा १००वा कसोटी सामना खेळणार आहे. यामुळेच या सामन्यासाठी प्रेक्षकांना मोहाली स्टेडियमवर परवानगी देण्यात आली आहे.

कसोटी फॉरमॅटमध्ये भारत आणि श्रीलंका (india vs srilanka) यांच्यात ४४ सामने झाले आहेत. भारताने २० सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने ७ सामने जिंकले आहेत. तर १७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारतीय भूमीवर खेळताना श्रीलंकेने आतापर्यंत कधीही भारताला कसोटी सामन्यात पराभूत केले नाही. त्यामुळे T20 मालिकेप्रमाणेच भारतीय संघ या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही श्रीलंकेवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करताना दिसेल.

मोहालीची पीच बघता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करताना अधिक संघांनी सामने जिंकले आहेत. शिवाय, पहिल्या डावात श्रीलंकेला कमी धावसंख्येवर बाद करून गोलंदाजी करताना त्यांच्यावर दबाव टाकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. प्रथम फलंदाजी करण्याऐवजी प्रथम गोलंदाजी करण्याचेही श्रीलंकेचे लक्ष्य असेल. त्यामुळे भारतीय संघ हा ऐतिहासिक सामना जिंकत माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला भेट म्हणून देण्यास उत्सुक दिसेल. तसेच भारतीय क्रिकेट रसिकही १०० व्या सामन्यात विराटचा प्रतिक्षीत ७१ वा शतक झळकेल याची आशा करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!