🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. मात्र, आता काही प्रमाण स्थिती आटोक्यात आपल्याने हळू-हळू सर्वकाही पूर्वी प्रमाणे सुरळीत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागात लोकप्रिय बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज हे कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करावे याकरिता भाजप आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
@CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/wyCOwvzvzr
— Nitesh Rane (@NiteshNRane) September 27, 2021
नितेश यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की,’ कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्ष सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्पटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यत आणि बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय आणि पारंपारिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.’
दरम्यान, ‘या कार्यक्रमांमध्ये बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल. असा मी विश्वास देतो. तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शर्यतीस अधीन राहून सुरु करण्यात परवानगी द्यावी’ असेही या पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील पोलीस खात्याला गृहमंत्र्यांनी वेगळे काही काम दिले आहे का?’, भाजपाचा सवाल
- ‘आदित्यला लग्नासाठी मुलगीही मोदी सरकारने द्यावी, वऱ्हाडींचा खर्चही उचलावा’, निलेश राणेंचा खोचक टोला
- काँग्रेसच्या नेत्याकडून चक्क भाजप उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसमध्ये खळबळ
- …नाहीतर भाजपसारख्या पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच ओवैसींकडे पाहिलं जाईल- संजय राऊत
- मुस्लिमांची अवस्था वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी- असदुद्दीन ओवैसी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
