🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार चालू आहे. पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात विधानसभा निवडणूका आहेत. काही राज्यात निवडणुका झाल्या आहेत, तर काही राज्यात अजून निवडणूका पूर्ण व्हायच्या आहेत. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपले असून, उत्तरप्रदेशमध्ये अजून काही टप्याचे मतदान बाकी आहे. उत्तरप्रदेश निवडणुकांचा प्रचार करतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना आज सोनिया गांधी म्हणाल्या कि, ” भारत देशात मोदी आणि योगी सरकार ही सर्वात निरुपयोगी आणि बेजाबदार सरकार आहेत. उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारवर निशाणा साधला. त्या राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. ”आज देशात अनेक महत्वाचे प्रश्न उभे ठाकले आहेत, मात्र मोदी आणि योगी यांचं त्या जटिल प्रश्नांकडे आजिबात लक्ष द्यायला वेळ नाहीये असेही आज सोनिया गांधी म्हणाल्या. ”भारत देशातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. देशातील युवा रोजगार मागत वण- वण करत आहे. देशातील सरकारी नोकरीतील तब्बल १२ लाख पद रिक्त आहेत; मात्र सरकार भरती प्रक्रिया सुरूच करत नाहीये.
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी गेले ५ वर्ष समाजात फक्त फूट पाडण्याचेच काम केले आहे. म्हणून मोदी आणि योगी सरकार देशातील सर्वात बेजबाबदार सरकार ठरतात असे सोनिया गांधी यांनी ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘जिल्हा बँकांनी साखर करखान्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधावे’; शरद पवारांचा सल्ला
- ‘हिंदुत्वावरून फडणवीस यांचा शिवसेनेला पुन्हा टोला; म्हणाले…
- ‘जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली’ – अॅड. प्रकाश आंबेडकर
- ‘नागरिकांनी लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- ‘सत्ताधाऱ्यांनी ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय’ – गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
