मुंबई: मुंबई प्रभाग रचनेच्या विरोधात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात पेटीशन दाखल केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवजयंती संदर्भात भाष्य केलं. तसेच बदलापूर येथे १९२७ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित होते तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी जय भवानी ही घोषणा दिली होती हे खरं आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.
‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती. तसेच बाबासाहेबांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाज माध्यमाद्वारे केले. या वेळी त्यांनी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली काही पत्रेही दाखला म्हणून सादर केली. दरम्यान, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी ॲड. आंबेडकरांच्या विधानाला दुजोरा दिला, तर काहींनी ही घोषणा त्यापूर्वीही दिल्याचे मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
‘नागरिकांनी लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
‘सत्ताधाऱ्यांनी ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय’ – गोपीचंद पडळकर
‘फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही’ – आदित्य ठाकरे
‘संजय राऊत यांना सल्ला देण्याचे धाडस परमेश्वरही करणार नाही’ – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

