मुंबई: राज्यातील जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद आज नवी मुंबईत पार पडली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवारांनी मार्गदर्शन करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवारांनी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
साखर कारखाने आता साखरे सोबतच पर्यायी इथेनॉल आणि वीज तयार करत असून येणाऱ्या काळात साखर कारखान्यांनी साखरेवर पैसे घेण्यास बंद केले तर त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या जिल्हा बँकांवर होण्याची शक्यता असून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली’ – अॅड. प्रकाश आंबेडकर
‘नागरिकांनी लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
‘सत्ताधाऱ्यांनी ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय’ – गोपीचंद पडळकर
‘फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही’ – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

