🕒 1 min read
मुंबई:- राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं आहे. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यातचं काल सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब आला आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिले. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. भविष्यात आदिवासी दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.
सोनिया गांधी फोन करून विविध मुद्द्यांवर चर्चा करत असतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी या चर्चांचा एक भाग म्हणूनच पत्र लिहिलं असेल. हा दबावतंत्राचा भाग आहे, असं वाटत नाही. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं असावं, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. सरकारच्या अडचणीही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीतही किमान समान कार्यक्रम राबवला जावा, अशी भूमिका मांडणं काही गैर नाही, असंही मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नाही : नितीशकुमार
- नेहा कक्करच्या बेबी बंप फोटोचे काय आहे सत्य? वाचा
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
