Share

“काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही”, अमर ज्योती विझवण्यावरून राहुल गांधींची टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: इंडिया गेटजवळील ‘अमर ज्योती’ ची मशाल आज विझवली जाणार आहे. आज दुपारी याचा एक हिस्सा नैशनल वॉर मेमोरियल येथे नेण्यात येणार आहे. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी तीव्र नाराजी जाहीर केली आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर नाराजी जाहीर केली आहे.

“खूप दुःखद बाब आहे की, आपल्या वीर सैनिकांसाठी जळत असलेली अमर ज्योति आज विझवली जाणार आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही.काही हरकत नाही, आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर ज्योति पुन्हा एकदा लावणार” असे ट्वीट राहू गांधी यांनी केले आहे.

दरम्यान इंडिया गेटजवळील ‘अमर ज्योती’ ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७२ साली याचे उद्घाटन केले होते. गेल्या ५० वर्षांपासून इंडिया गेटजवळ ही अमर ज्योती जळत होती. आज राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे ही अमर ज्योति स्थापित करण्यात येणार आहे. जी इंडिया गेटपासून ४०० मीटर लांबीवर आहे. मात्र या निर्णयामुळे कॉंग्रेसने तीव्र नाराजी जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!