🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा रद्द केल्यानंतर काहींच्या दबावाला बळी पडून २१ मार्चला परीक्षा ठरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा निर्णय मराठा विद्यार्थी उमेदवारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
आ.मेटे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सर्वांना न्याय देत असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा व शासकीय नोकर भरतीपासून वंचित ठेवू नये. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्या अनुषंगानेच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.
सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चपासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सुरू होत आहे. दि. २५ मार्चपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यांनतर काही दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा पाच एप्रिल नंतर घ्याव्यात ही समाजाची अपेक्षा आहे.
राज्यातील काही मंत्री, प्रशासकीय अधिकारी व नेते यांनी मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेत स्थान मिळू नये यासाठी ते काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विरोधात आंदोलन उभे केले. त्या दडपणाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतल्याचा आरोप मेटेंनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! अनुकंपा नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- घाम पुसण्यासाठी मास्क खाली केला तरी होतोय दंड!
- कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या पथकालाच ठोठावला दंड!
- आंदोलन, वाद, आरोप-प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडेंचा ‘वैद्यनाथ’ पुन्हा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
