सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्यात. पण सोलापूरकर अजूनही कोरोनाबाबत जागरूक नाहीत, असेच दिसून येते. बुधवारी तब्बल एकाच दिवसात ४९९ जणांवर विनामास्क फिरल्याबद्दल कारवाई झाली आहे. तर तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
म्हणजे जवळपास तीन लाखांचा दंड भरू. पण मास्क लावणार नाही, अशी स्थिती सोलापूरकरांची आहे. असे या दंडात्मक कारवाईवरून दिसते. विनामास्कसोबतच एकूण आठ दुकानांवर तर ३०८ वाहनांवरती दंडात्मक कारवाई झाली आहे. एकूण ३ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरामध्ये दररोज ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते. तर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य नाक्यांवरतीही नाकाबंदी असते. सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एकूण कारवाई मोहिमेदरम्यान तीन लाख ८६ हजार ९०० रुपये दंड सोलापूरकरांनी भरला आहे. त्यात तब्बल ४९९ जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावरून सोलापूरमधील नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देण्यात येत आहेत. ‘तुम्ही लाख दंड भराल, पण कोरोनापासून कसे बचावणार?’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘कर्ज फेडण्यासाठी छोट्या कर्जदारांना जास्त वेळ द्या’, आरबीआयचे बँकांना निर्देश
- ‘कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले?’, राहुल गांधींचा मोदींना सवाल
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
