मुंबई : पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट घातक आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. या सर्वांवर उपाय लसीकरण आहे. मात्र, असे असताना केंद्राचे कुठलेही नियोजन दिसत नाही आणि कुठलेही धोरण नाही. सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. तसेच लसीकरणाचे धोरण केंद्राकडे नाही, असे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला कोर्ट सांगत आहे. पण केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत. लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. लसीकरणासाठी असणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ होत आहे. अॅपचे नियोजन राज्याने केले पाहिजे, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राला विनंती केली आहे की, आम्हाला आमचे अधिकार द्या. आज केंद्र सरकारचे निष्क्रिय धोरण दिसून येत आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
- खरं तर माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीमुळेचं वाचला ; अश्विनने सांगितला भावूक प्रसंग
- एक वेळ अशी येईल तो केवळ ‘मिस्टर ३६०’ म्हणुन सदैव स्मरणात राहिल, सेहवागकडुन एबीची स्तुती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

