🕒 1 min read
मुंबई : त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान या हिंसक घटनांवरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अनेक हिंसक घटना आणि दंगलींमागे रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. प्रत्येक वेळी ते शांतता भंग करतात सर्व नियम पायदळी तुडवतात आणि बसून राहतं, बघत बसतं. सरकारने एकतर यांच्यावर बंदी आणावी, अन्यथा महाराष्ट्राच्या आम्ही भल्यासाठी त्यांना संपवू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
This terrorist organisation Raza academy is behind all the violonce and riots in different parts of Maharashtra!
Every time they disrupt n break all the rules n Gov sits and watches..
Either the Gov bans them or we have to finish them in the interest of Maharashtra!— Nitesh Rane (@NiteshNRane) November 13, 2021
दरम्यान, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचं सरकार पाडण्यासाठी भाजपची कारस्थानं सुरु आहेत- संजय राऊत
- “…तर मी माझा पुरस्कार परत करेन”; कंगनाची प्रतिक्रिया
- हसन अलीला ट्रोल केल्याबद्दल पाकिस्तानी चाहत्यांवर भडकला हरभजन, म्हणाला…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
