Share

…तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं; भाजपच्या टीकेला मुश्रीफांचं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार अधिवेशन घेण्यासाठी घाबरत आहे, अशी टीका गेले अनेक दिवस भाजप करत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं घ्यायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं. त्यामुळेच साधारणतः महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालणार आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता गेल्या वर्षभरातील अधिवेशने आटोपतीच घेण्यात आली. विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यास महाविकास आघाडी घाबरते, यामुळेच अधिवेशन कालावधी घटवला जातोय अशी टीका भाजप नेत्यांनी केला आहे. अधिवेशन आलं की कोरोना रुग्णांची संख्या कशी काय वाढतेय ? असा प्रश्न देखील भाजपने केला आहे.

भाजपच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जर एवढचं वाटतंय तर विरोधकांनी त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं,’ असं आव्हानच हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

असे होणार अधिवेशनाचे कामकाज –

  • पहिला दिवस (१ मार्च) – राज्यपालांचं अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
  • दुसरा, तिसरा दिवस (२ मार्च, ३ मार्च) – राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
  • चौथा, पाचवा दिवस – (४ मार्च, ५ मार्च) – पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
  • सहावा, सातवा दिवस (६ मार्च, ७ मार्च) – शनिवार, रविवारची सुट्टी
  • आठवा दिवस (८ मार्च) – अर्थसंकल्प सादर होणार
  • नववा दिवस (९ मार्च) – शासकीय कामकाज
  • दहावा दिवस (१० मार्च) – अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!