पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. तर कोरोना स्थिती लक्षात घेता ११ जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता लेवल ३ चे निर्बंध कायम ठेवले आहेत. यासोबतच, गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं. या ११ जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेते आणि व्यापारी यांनी केली आहे. दरम्यान, पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवून राज्य सरकार व प्रशासनाला सहकार्य केलं होतं. आता कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या कमी होऊन देखील निर्बंध का लागू ठेवले आहेत ? असा सवाल पुण्यातील व्यापारी महासंघाने केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन महासंघातर्फे राज्य सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे.
‘पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी दुपारी १२ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सरकारनं ऐकलं नाही, तर बुधवारपासून दुपारी ४ नंतरही दुकानं सुरु ठेऊ, असा इशारा दिला आहे. यासोबतच, कोरोना नियमांचं उल्लंघन केलं म्हणून व्यापाऱ्यांना जरी अटक केली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या फतेचंद रांका यांनी जाहीर केली आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी सरकारनं द्यावी, अन्यथा आम्ही ती उघडी ठेऊ, असं देखील महासंघातर्फे सांगण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरेंनी भूमिपूजन केलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची वर्क ऑर्डर आमच्या सरकारच्या काळातील’
- आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही – देवेंद्र फडणवीस
- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय; छगन भुजबळ आक्रमक
- ‘आदित्यजी…त्यावेळी तुमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल’; काँग्रेस मंत्र्याने केलं कौतुक
- महाराष्ट्राची चिंता वाढली ; पुरंदर तालुक्यात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण


