मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली यांचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचे कारण सांगितले आहे. ‘आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना कधीही बोलली नाही. आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका घेऊन मी मोर्चात सहभागी झालो होतो. तेव्हा माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरू झाली राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. बाळासाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेणार होते. त्याचवेळी मंडल आयोग लागू झाला पाहिजे, म्हणून अनेक आमदार माझ्यासोबत होते. अन् हेच कारण झालं मी शिवसेना सोडली’, असे भुजबळ यांनी सांगितले.
मी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी वसंतदादा पाटलांच्या अंगावर आम्ही धावून जायचो, तत्कालीन सरकारने आम्ही मंडल आयोग स्वीकारतोय, असं सांगितलं होते. व्ही. पी. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं. अन् माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरु झाली.
बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब नाशिकच्या घरी आले होते. त्याचवेळी भटक्या विमुक्तांचा मोर्चा निघाला होता. बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. आरक्षण मिळालं पाहिजे, असं मी नेहमी म्हणायचो. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते. त्यामुळे शिवसेना आणि माझ्यात दुरावा झाला अन् मी शिवसेना सोडली. त्यानंतर मी समता परिषदेची स्थापना केली, असं भुजबळ म्हणाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकार टिकवायचं की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरेंच्या हातात’
- भाजपने त्वरित आमदार सुनील कांबळे यांना निलंबित करावे; राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

