🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. २०१८ मध्ये प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांनाही अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. मराठा आरक्षण न्यायालयात अडकल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने होणाऱ्या भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या होत्या. यात काही विद्यार्थ्यांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली होती, तर काही विद्यार्थी मराठा आरक्षणाचा निकाल लागू द्यावा, या मताचे होते. मात्र, या सर्वात अनेक विद्यार्थी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रतिक्षा करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. आता पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं वळसे-पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर तोत्के चक्रीवादळात गुजरातसह कोकणालाही मोठा फटका बसलाय. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटीच्या मदतीची घोषणा केली आहे. पण महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नाही. त्यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी असे ते म्हणाले आहेत.
- औरंगाबादेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहर काँग्रेसची ‘विशेष’ कमिटी!
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- औरंगाबादेत दुसरी लाट ओसरल्यावर काँग्रेसने सुरु केले क्वारंटाईन सेंटर !
- औरंगाबाद पालिकेला दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळाले आरोग्य वैद्यकीय अधिकारी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
