Share

…तर ऑलम्पिकमध्ये महिला व पुरुष दोन्ही क्रिकेटचे संघ खेळणार

Published On: 

मुंबई : बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटचा संघ सहभागी होणार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्वोच्च समितीने स्पष्ट केले आहे. तसेच जर २०२८ साली होणाऱ्या लॉस अँजेलिस येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत जर क्रिकेटता समावेश झाला तर त्या स्पर्धेत महिला आणि पुरुष दोन्ही संघ पाठवले जाईल. याआधी यावरुन बरीच चर्चा झाली होती.

सुत्राच्या माहितीनुसार, भारतीय महिला क्रिकेट संघ बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत खेळेल.आणि जर क्रिकेटचा समावेश २०२८ लॉस अँजलिस ऑलिंपिकमध्ये झाल्यास पुरुष व महिला दोन्ही संघ यात सहभागी होतील. क्रिकेटच्या ऑलम्पिकमध्ये समावेशावरुन यापुर्वी अनेकदा चर्चा झाली होती. मात्र क्रिकेटचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली होती. यामागे कारण होती सामन्याचा कालावधी एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने ऑलम्पिकमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही. मात्र क्रिकेटचा टी-२० हा नवीन प्रकार समाविष्ट होउ शकतो. असा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बीसीसीआयच्या वर्चुअल बैठकीत घेण्यात आला.

बीसीसीआयच्या या बैठकीत भारताचा महिला क्रिकेट संघ हा २०२१ वर्षाच्या आखेरीस ऑस्ट्रेलीया दोऱ्यावर जाणार अशी घोषणा देखील करण्यात आली. मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यां दोघी संघाचे नेतृत्व करतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. तसेच महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा दौरा पण होईल असे सांगण्यात आले. अशी माहिती एका खासगी वृत्तसंस्थेने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!