🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय महीला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती भारताकडून २५०० धावा करणारी चौथी महीला क्रिकेटर बनली. तिने हा कारनामा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला आहे.
ती भारतीय संघाची वरच्या फळीतील महत्वाची खेळाडू आहे. सलामीला खेळताना तिने संघाला अनेकवेळा जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. या अगोदर भारताकडून २५०० धावा मिताली राज, अंजुम चोपडा, आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावावर आहेत.
स्मृती मानधनाने २०२२ विश्वचषकाचा आगाज आपल्या अर्धशतकाने केला आहे .तिने या सामन्यात ७५ चेंडूत ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला तिच्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत. तिने आतापर्यंत ६५ वनडे सामन्यात ४१.८८ च्या सरासरीने २५१३ धावा केल्या आहेत. तर १३५ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
