🕒 1 min read
औरंगाबाद : सोयगाव शहराला गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाळमिश्रीत गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा सुरू असून पाणी पुरवठ्याची स्थिती अशीच राहिल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती असल्याने शहरातील नागरिक नगरपंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.
वेताळवाडी ता.सोयगाव स्थित जलाशयातुन सोयगाव शहरासह कै.बाबुराव काळे नगर,नारळीबाग,राममंदीर गल्ली,भवानी नगर,आदी वार्डात जलशुद्धी करनाने पाणी पुरवठा केला जातो.देशभरात कोरोना महामारी असल्याने पाण्याचा वापर वाढला असतांना नगरपंच्यायत च्या नियोजन शुंन्य कारभाराने आठ ते दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे ग्रामस्थ पार वैतागले आहे. तर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपंच्यायतला काही अशी यश आले मात्र गेल्या दोन-तीन दिवसापांसून शहरात गाळमिश्रीत आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून असाच पाणीपुरवठा सुरू राहिल्यास साथीचे आजार बळावण्यची भीती व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांना केंद्रात बोलावून भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल ?
- इन्स्टावर व्हायरल होणार भूत आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; पहा व्हिडिओ
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे ! जाणून घ्या किती आहे रक्कम
- ‘राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील दगडफेकीला योग्य उत्तर दिलं जाईल, भाजपसाठी ही धोक्याची घंटा’
- ‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न


