मुंबई : मार्च महीन्यात भारत दौऱ्यावर इंग्लंडचा संघ आला होता. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर तो दुखापतीमुळे अद्यापही मैदानाबाहेर आहे.
यानंतर श्रेयस अय्यरच्या खाद्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यादरम्यान श्रेयसने आयपीएल स्पर्धेतूनही माघार घेतली होती. मात्र आता तो पुर्णपणे फीट झाला आहे. काही दिवसापुर्वीच त्याने सरावाला सुरुवात केली आहे. येत्या महिन्यातील आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामात भाग घेण्यासाठी सज्ज आहे. यादरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याचे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यावर लक्ष्य असणार आहे. असे सांगितले.
यावेळी तो म्हणाला,’टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा ही कायमच असते. दुखापतीमुळे संघात पुनरागमन करण्यासाठी मी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगला खेळ करुन मला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवायचे आहे.’ यादरम्यान अय्यरच्या दुखापतीदरम्यान भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि इशान किशनने पदार्पण केले आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरसाठी टीम इंडियात पुनरागमन करणे अवघड असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

