मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. शनिवारी संपलेल्या लीड्स कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. पुढील कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे.
यादरम्यान या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातही बदलाचे वारे वाहत आहे. अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा ओव्हल कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामागे दोन कारणे आहे. यातील पहिले कारण आहे, इशांतची घोट्याची दुखापत. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे आणि स्नायुत ताण जाणवल्यामुळे त्रस्त होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो पुर्णपणे फिट आहे का नाही याबद्दल अद्यापही साशंकता आहे.
तसेच इंग्लंड विरुद्ध मालिकेत इशांत शर्माने केवळ ५ गडी केले आहे. पहिल्या कसोटीतील शार्दुल ठाकुरच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळवू शकला नाही. यामुळे खराब कामगीरीमुळे देखील त्याला संघातुन वगळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागते का आर अश्विनची याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
- सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

