🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देऊन लोकेश राहुल आणि शिखर धवन ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. लोकेश राहुल, शिखर धवन आणि कर्णधार कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज झटपटमाघारी परतल्यांन भारतीय संघ अडचणीत सापडला होता. रिषभ पंतनं आणि हार्दिक पांड्याने फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली.
यादरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. या खेळी दरम्यान श्रेयसने रोहित शर्माच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावावर माघारी परतल्यानंतर अर्धशतक करणारा श्रेयस हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम रोहित शर्माने २०१० मध्ये ऑस्ट्रेलीया विरुद्ध केला होता.
तसेच भारताकडून चौथ्या क्रमांकावर टी-२० सामन्यात सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या यादीत तो युवराज सिंगनंतर श्रेयस अय्यरचा नंबर लागतो. संपुर्ण २० षटकें खेळून भारताची तिसरी निचांकी धावसख्या ठरली. यापुर्वी इंग्लंडविरुद्ध ९ बाद १२० धावा तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ८ बाद ११८ धावांचा निचांक भारतीय संघाने केला होता.
महत्वाच्या बातम्या
- बधाई हो…ताराने दिल्या बुमराहला लग्नच्या शुभेच्छा, पहा पोस्ट
- नुकतच लाँच केलेल्या होंडाच्या ‘या’ शानदार बाईकमध्ये दोष; कंपनीने गाड्या परत मागवल्या
- ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवचा बोल्ड अंदाज…
- दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात ‘हे’ दोन बदल होण्याची शक्यता
- विलास चौधरी यांना राज्यसरकारचा औरंगाबाद विभागातून पुरस्कार घोषीत


