Share

लातूर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोविड रुग्णांचे हाल

Published On: 

लातूर: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या पादुर्भावला रोखण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर काम करीत आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. पण इंजेक्शनच्या मागणीला पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे दिसून येत.

दरम्यान, पालकमंत्री यांनी आढावा बैठक घेऊन इंजेक्शनचा तुटवडा भासू देऊ नका असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर सुद्धा इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचे दिसून येत आहे. सध्या लातूरकर इंजेक्शनसाठी पायपीट करत असून, पत्रकार, राजकारण्यांना मदत मागण्या पर्यंतच्या घटना घडत आहेत. यामुळे पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का? असा प्रश्न सामन्यांना पडत आहे.

एकीकडे रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा भासणार नाही आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा सामान्यांना इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. हे विशेष, त्यामुळे काळाबाजार होण्याचीही संभावना वर्तवली जात आहे. येणाऱ्या काळात तरी रुग्णांना इंजेक्शन मिळेल का? कि रुग्णांना राम भरवसे सोडले आहे असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!