Share

माझी जबाबदारी, मीच विसरलो…भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

सुरुवातीला हे दोघेही घरीच विलगीकरणात होते. मात्र, प्रकृती खालावल्याने रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रश्मी ठाकरे यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता होम क्वारंटाईन आहेत.

गेल्या वर्षी कोरोना रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, आर्थिक डबघाई, अवकाळी पाऊस, वादळ अशा अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागले होते. तर, याकाळात जनता संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच असल्याची टीका भाजपसह इतर विरोधी पक्षांनी केली होती.

आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कोरोना स्थिती बिकट होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच आहेत, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. ‘माझी जबाबदारी… मीच विसरलो!! माझ्या घरात… मीच क्वारंटाईन… महाराष्ट्र सोडला वाऱ्यावर…!’ असं ट्विट करत भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी खोचक टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!