मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फॅॅक्ट चेक केलं. त्यानंतर हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगत या घटनेची तक्रार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) करण्यात आली आहे.
आमदार नितेश राणे आणि मिलिंद देवरा यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते.
Outraged to see corpses laid beside the sick at Sion Hospital. Why isn’t @mybmc following @WHO-prescribed protocols when disposing of #COVIDー19 corpses?
Public hospital staff are doing their best with limited resources at hand. Mumbai’s administration needs to step up NOW! pic.twitter.com/MURUNsIyfc
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) May 7, 2020
त्यांनतर किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओबाबत चौकशी केली. त्यानंतर ही व्हिडीओ खरी असल्याचं समोर आलं. यावर रुग्णालयातील डॉक्टरांनीही याची कबुली दिली आहे. मृत रुग्णांचे नातेवाईक बॉडी क्लेम करायला लवकर येत नाहीत. तर दुसरीकडे नव्याने येणाऱ्या रुग्णांनाही दाखल करून घ्यावे लागते. त्यामुळे नाईलाजाने मृतदेह वॉर्डातच ठेवावे लागत असल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांनी दिली.
I talked with the person who has recorded the video..he says its ward no 5, ground floor, emergency/COVID19 section of Sion Hospital.. pathetic condition of dead bodies along with patients
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 7, 2020
तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाची बाजू मांडली आहे. नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासंबंधी दिरंगाई केली जाते. नातेवाईक जर येत असतील तर मृतदेह तिथेच प्लास्टिक रॅप करुन देण्याचा विचार प्रशासनाने केला असावा, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
महत्वाच्या बातम्या
अजूनही मजुरांना तिकीट काढूनचं जावं लागतय, ‘त्या’बाबत रेल्वेकडून कोणताचं आदेश आला नाही
परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

