मुंबई : काल शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी हालचाल होणार असल्याचं दिसून येतं आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडायला सुरूवात केली आहे. अशातच यावर मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे.
दोन्ही पक्षांना राजकीय-
शिवसेना पक्षाला आता कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. परंतू जरी हे खरं असले तरी दोन्ही पक्षांना राजकीय गरज असल्याने ही युती झाली असल्यामुळे मी या युतीचे स्वागत करत असल्याचं पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितलं आहे.
पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला सल्ला-
या अनपेक्षित पक्षांच्या युतीवर पुरुषोत्तम खेडकर एक सल्लाही दिला आहे. या दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात काही मतभेद झाले तरी ते त्यावर वेळेनुसार आणि परस्थिती नुसार योग्य ते बदल करावे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या युतीच्या निर्णयामुळे मराठा मते एकाच ठिकाणी राहण्यासही मदत होणार आहे. तरीही दोन्ही गटाने किमान समान कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद खेडकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सेना पुन्हा उभारी घेईल-
तसेच, शिवसेना पक्ष हा प्रबोधनकारांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. सेनेचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाहीय हे आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सेना पुन्हा उभारी घेईल, असंही खेडकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tripti Desai । “उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे, म्हणून तर…”; शिवसेना-संभाजी ब्रिगेट युतीवर देसाईंच मोठं वक्तव्य
- Rajan Vichare | आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार, हे जनताच ठरवेल- राजन विचारे
- Sharad Pokshe । “विनाश काले विपरीत बुध्दी”; शिवसेना-संभाजी ब्रिगेट युतीवर पोक्षेंची पोस्ट चर्चेत
- Eknath Shinde | राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाहीय- एकनाथ शिंदे
- Gulam Nabi Azad | काँग्रेस पक्ष सोडताच गुलाम नबी आझाद यांनी पुढील राजकीय वाटचालीची केली ‘ही’ मोठी घोषणा


