🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं आहे. तसेच काही देशातील झालंं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक उलाढाली होताना दिसून येतं आहेत. अशताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा धक्का बसला असल्याचं समजतं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक घोषणा देखील केली असल्याचं समजतं आहे.
गुलाम नबी आझाद यांनी केली एक घोषणा-
तसेच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद भाजप पक्षामध्ये जाणार की आणखी कोणत्या पक्षामध्ये अशा अनेक विषयांवर तर्क-वितर्क केले जात आहेत. अशातच गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
नव्या पक्षाची स्थापना करणार-
आता मी जम्मू काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. मात्र भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. माझे विरोधक गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा उठवत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, असं आझाद यांनी म्हटलं आहे.
जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला-
दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडताना गुलाम नबी आझाद यांनी आपले राजीनामा पत्र नीकाँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे.त्या पत्रामध्ये त्यांनी अत्यंत खेदानं आणि अंतः करणानं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं नमूद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत; राज्यपाल कोश्यारी यांचे जॅकी श्रॉफ यांना आवाहन
- Nilesh Rane | शाहरुख खान एवढी क्रेझ शहाजीबापू पाटलांची महाराष्ट्रात झाली – निलेश राणे
- MNS । ‘सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली’, मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Shahajibapu Patil | “मानसी ताई म्हणतात पाटील जोमात” ; शहाजीबापूंची पुन्हा एकदा तुफान डायलॉग बाजी
- Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर घरी बसले नसते; नवनीत राणांची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
