Share

‘बावनकुळेंनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की भाजपने तिकिटच दिले नाही’

Published On: 

बुलढाणा : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आले असताना आयोजित पत्रकार परिषद मध्ये बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष संबोधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला होता. त्यावर लगेचच शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

बावनकुळे हे मंत्री असताना त्यांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना भाजपाने तिकीटच दिलं नाही, आणि आता शिवसेने विरुद्ध गरळ ओकून पक्षात ते आपले महत्त्व वाढविण्याचा आटा-पिटा करीत आहेत अशी तिखट प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

तर शिवसेने ने पाठीत खंजीर खुपसले हे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकी पूर्वी समान जागांचा फार्मुला ठरला होता, यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले नव्हते तर अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर येऊन हि बोलणी झाली होती. असे असतांना विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शिवसेना उमेदवारांच्या विरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे करून त्यांनीच पाठीत खंजीर खुपसले असल्याचा आरोप देखील प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!