बुलढाणा : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा येऊन देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, कोरोना, वादळ, अतिवृष्टी, भ्रष्टाचार अशा विविध आरोपांवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.
कोरोना काळात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदाराचा तोल घसरल्याचे समोर आले आहे.
‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यासोबतच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असून भाजप नेते सरकार पाडायला निघालेआहेत. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे, तो केंद्राने सुरळीत करावा’ असं देखील गायकवाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसविरचा मोठा साठा पडून, केंद्राने ‘तो’ साठा उपलब्ध करून द्यावा – मनसे
- विराटच्या विजयाचा रथ रोखण्याचे मॉर्गनपुढे आव्हान; सुपर संडे मध्ये आज आरसीबी-केकेआर भिडणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना फोन, महाराष्ट्रासाठी महत्वाचं आश्वासन !
- एका व्यासायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव ! त्यांचा दोष काय? काँग्रेसचा फडणवीस-दरेकरांना सवाल
- पोलार्डने मारला या मोसमातील सर्वात लांब षटकार : पहा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

