🕒 1 min read
मुंबई :शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वारंवार सुनावणीची तारीख पुढे ढकळली जात असल्यामुळे ही याचिका करण्यात आली आहे. तारीख पुढे ढकळण्याचं कारण काय हे आम्ही याचिकाद्वारे विचारणार असल्याचं न्यायालयातील वकीर राजसाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाची सुनावणी तारीखेत विलंबः
शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात शिवसेनेने याचिका दाखल केली होती. या अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. काल त्याची सुनावणी होणार होती. काल ही सुनावणी न झाल्यामुळे आज निकालाची शक्यता आहे. यादरम्यान, आजच्या कोर्टाच्या सत्तापेचाच्या खटल्याचा उल्लेख नसल्यामुळे आजही ही सुनावणी होणार नसल्याची शक्यता आहे.
शिंंदे गटाचा बंडः
दरम्यान, बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. मात्र, धनुष्यबाण हे शिवसेनेचे मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे. त्यामुळे याबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी किमान त्याची सुनावणी करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Assembly Session 2022 | “५० खोके, ५० खोके, खावून, खावून माजले बोके” ; विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
- Rakesh Tikait | भाजप यांचं फोडाफोडीचा राजकारण रोखण्यासाठी आता… तुमचा देखील उद्धव ठाकरे होईल, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल
- Sapna Chaudhary | सपना चौधरी अडचणीत, न्यायालाकडून अटक वाॅरंट
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, आता ‘या’ आमदाराने पुकारलं बंड
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिल्या ‘या’ विशेष सूचना, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
