Share

“शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…”,संजय राऊतांचे कॉंग्रेस आघाडीबाबत मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: काल (२० फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Karnataka CM K.Chandrashekhar Rao) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. त्यांच्यात अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. तसेच राव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट टाळल्याने अनेक चर्चांना उधान आले. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया दिली आहे.

“आम्ही हे कधीच नाही म्हणालो की, काँग्रेस शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असे म्हटले होते. तसेच चंद्रशेखर राव यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे”, असे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकाससाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर नक्कीचं लोकशाहीत त्याचे स्वागत झाले पाहिजे. परंतु काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही असं वाटतंय’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!