🕒 1 min read
मुंबई: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याला श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर मात्र एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. रिद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. सौरव गांगुलीने दिलेला शब्द न पाळल्याचे रिद्धिमान साहाने सांगितले.
श्रीलंका दौऱ्यासाठी साहाला संघात जागा मिळाली नाही. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलीबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला “कानपूर येथे न्यूझीलँडमध्ये ६१ धावा केल्यानंतर दादाने (गांगुली) माझे व्हॉट्सअॅपवर अभिनंदन केले आणि ‘मी इथे (बीसीसीआय) असेपर्यंत तू असशील ‘ असे सांगितले बीसीसीआय अध्यक्षांच्या अशा संदेशाने खरोखरच माझा आत्मविश्वास वाढवला. मला हे समजतच नाहीये की गोष्टी इतक्या वेगाने कशा बदलल्या ,”
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली विराट कोहली सोबतच्या तणावानंतर सतत वादाचा विषय बनला आहे. काही ना काही कारणाने त्याचे नाव चर्चेत येत असते. आता साहाच्या खुलास्याने त्यांच्या भोवती पुन्हा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. दादाने अजून तरी साहाच्या या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र त्यांनी साहाला दिलेला शब्द न पाळल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
- “महाराष्ट्रावर एखादा थुंकत असेल तर आम्ही त्याची…”, संजय राऊतांचा इशारा
- रिद्धिमान साहाला पत्रकारांकडून धमकीचे मेसेज; फोटो व्हायरल
- “…त्यांच्याकडून शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय”, संजय राऊतांचा मोदींना टोला
- IND vs WI: भारताने केला सलग दुसऱ्यांदा विंडीचा व्हाईट वॉश

