Share

‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. तर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.

यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला राजकरणापलीकडे जाऊन भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. कृषी विधेयकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सध्या स्वतंत्र भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शेतीची अर्थव्यवस्था माहिती असलेले लोक कृषी विधेयके चुकीचीच आहेत, असे सांगतील. केंद्र सरकारच्या जाहिराती बारकाईने पाहिल्यास सरकारचा फसवेपणा लक्षात येईल. बाजार समिती हे आधारभूत किंमत देण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. त्या मोडीत काढून शेतमालाची विक्री बाजार समितीच्या बाहेर होणार आहे. मग तिकडे आधारभूत किंमत कशी मिळू शकते, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!