मुंबई: शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान करत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे. दरम्यान यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनंत गितेंच्या एका लाईनला आमचं समर्थन आहे. दुसऱ्या लाईनला नाही. शिवसेना ही काँग्रेस अलायन्स होऊ शकत नाही. ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार महाविकास आघाडीचा हा एक प्रयोग आहे असं म्हणत अनंत गितेंच्या यांच्या एका वक्तव्याचे नाना पटोले यांनी समर्थन केले आहे. तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान अनंत गीते यांच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत तसेच विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी वैफल्यग्रस्त भावनेतून हे वक्तव्य केलं असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनंत गीतेंनी पवारसाहेबांच्या पायाला हात लावत केलेल्या आघाडीबद्दल आभार मानले होते; तटकरेंचा गौप्यस्फोट
- दानवेंना मी या आठवड्यात दोनदा भेटलो, असेच भेटत राहिलो तर…; देसाईंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
- ‘सुप्रिया ताई, सोमय्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर; वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
- …अन् संजय राऊत तडक म्हणाले, ‘किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

