🕒 1 min read
Ajit Pawar । मुंबई : गेल्या महिन्यात राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. पुढे त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या सर्व घडामोडी घडताना मागील काही दिवसांत शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. मात्र सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला तरी आजून मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता सरकारवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हातात मंत्रिमंडळाचे फारसे काही दिसत नसून, दिल्लीतून जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाहीत, असे दिसत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील अतिवृष्टी, कारभार यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात अतिवृष्टीची स्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहेत, अशा स्थितीत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करायला हव्यात. तातडीने अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील गेल्या आठवड्यात त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | युवा सेना प्रमुख आता फिरायला लागले, या आधी ते कधीच दिसत नव्हते – दीपक केसरकर
- Deepak Kesarkar | आमच्या खासदारांच्या घरावरती मोर्चा काढला, कोणी दिला तुम्हाला अधिकार – दीपक केसरकर
- ajit pawar | बहुमत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार का नाही?- अजित पवार
- Pravin Darekar | सत्ता असतानाच फिरले असते तर आता गट्टी जमवण्याची वेळ आली नसती – प्रवीण दरेकर
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांना मातृशोक; शरद पवारांनी पत्र पाठवत केले सांत्वन


