Share

शरद पवारांनी एकनाथ खडसेंना वाचवण्याचाच प्रयत्न केला : अंजली दमानिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशादरम्यान एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून खडसेंबाबतची तक्रार केली होती. मात्र शरद पवारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करत एकनाथ खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अंजली दमानिया माध्यमांशी बोलतांना केला.

भाजप सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी दमानियांवर केलेल्या टीकेनंतर ‘कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही’, असा थेट इशारा दिल्यानंतरही खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशदरम्यान त्यांच्यावर पुन्हा वादग्रस्त टीका केली होती.

खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजप सोडताना खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले होते. याच पार्श्वभूमीवर, खडसे आणि दमानिया यांच्यातील वाद अद्यापही सुरूच असलेला पाहायला मिळतो आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!