🕒 1 min read
मुंबई : वेदांता-फॉकस्कॉन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा प्रकल्प राज्यातून जाण्याला विरोधी पक्षनेते सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. तर सत्ताधारी नेते महाविकास आघाडी सरकारला दोषी समजतं आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईमधील एका आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पासाठी राज्यात जागाही ठरली होती. नव्या पिढीला अधिक संधी मिळाली असती, त्यामुळे तो प्रकल्प येथे होणं गरजेचं होतं.
तर जास्त आनंद झाला असता –
पुढे बोलताना शरद पवार असंही म्हणाले, वेदांता-फॉकस्कॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही म्हणून काय झाले देशात कुठेतरी होत आहे याचा आनंद आहे.परंतू महाराष्ट्रात झाला असता तर जास्त आनंद झाला असता. त्याचबरोबर हे जरी असले तरी मी विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नसल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
तसेच, राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. पण आज जर तसे वातावरण नसेल, तर कोणतीही राजकीय भूमिका न घेता सर्वांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशा प्रश्नांवर आमची भूमिका सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या :
- uddhav Thackeray | “…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो”
- Best Scooters for Women | सुरक्षेपासून ते किमतीपर्यंत, ‘या’ स्कूटर महिलांसाठी आहेत सर्वोत्तम,बघा यादी!
- Shivsena | आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन शिवसेनेनं नरेंद्र मोदी अन् अमृता फडणवीसांना धरलं धारेवर, म्हणाले…
- Samsung Sale 2022 | सॅमसंग गॅलेक्सी फोन, टॅब्लेट आणि वेअरेबलवर बंपर सूट
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
