टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यावर विनायक मेटे यांनी भाष्य केले आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सर्वाधिक पक्षांतर केले आहे. यावर भाष्य करताना मेटे यांनी या पक्षांतराला थेट शरद पवारांनाच जबाबदार धरले आहे. त्यांनी भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदार आहेत. या वयात त्यांना होत असलेल्या कष्टामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुखःच होईल अस विधान केले आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे सध्या युतीसोबत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामने १२ जागांची मागणी केली आहे. परंतु अद्याप युतीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे शिवसंग्रामला नेमक्या किती जागा मिळतात हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा ४ ऑगस्ट रोजी बीडमध्ये
शाहू महाराजांनंतर मुख्यमंत्र्यांनीचं मराठा समाजासाठी सर्वाधिक काम केले : विनायक मेटे
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

