Share

Sharad Pawar | “बलात्काऱ्यांना सोडून देणं, हाच महिलांचा सन्मान का?”; शरद पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. परंतू या गुजरात सरकारने महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचे आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देते. हाच महिलांचा सन्मान आहे का?, असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारवर टीका केली आहे.

बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वाना माहीत आहे. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. मात्र महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतरही गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसे म्हणून सोडून देतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे, असा सवालही शरद पवार यांनी मोदी सरकारला केला असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, लोकांचा पाठिंबा मिळत असलेल्या राजकीय पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!