कर्जत: 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफिर दिल्याचा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तसेच शरद पवार हे एनडीए सोबत गेले असते तर सरकारमध्ये क्रमांक दोनच पद मिळालं असतं असा दावाही त्यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबीर सुरू आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटेल यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि तत्व वेगळे असल्याचही त्यांनी सांगितलं आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

