Share

लखीमपुर दुर्घटनेवर शरद पवार संतापले, म्हणाले..

Published On: 

पुणे: लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. ही धक्कादायक घटना लखीमपूर खेरीमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. या घटनेवरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याची क्रूर पद्धत आहे ही. मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. सोबतच त्यांनी #लखीमपुर खीरी नरसंहार असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

दरम्यान याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. तर काँग्रेस नेत्या खासदार प्रियांका गांधी यांना प्रदेश पोलिसांनी याठिकाणी जाण्यास मज्जाव करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!