Share

‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’

Published On: 

मुंबई: लखनऊ येथील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. तर यावरूनच माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिली होती.आणि ४ शेतकऱ्यांना मारून गृह राज्यमंत्री किती प्रमाणात जाऊ शकतात हे त्यांच्या मुलाने सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदीजी तुमचे सरकार आणि सरकारचे मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

दरम्यान याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांना पोलिसांनी तेथे जाण्यास रोखले आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!