ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये उत्तर सधा घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना फटकारलं आहे. अशातच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, कारण छत्रपतींचे नाव घेतलं की मुस्लिम मते मिळणार नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
त्याचबरोबर “बाकी राजकारण काय करायचं ते करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला भगवा विरुद्ध हिरवा रंग देऊन लहान करू नका”, असंही पुढे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही बरसले असल्याचं समजत आहे .
महत्वाच्या बातम्या :


