🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण यांच्या इंग्रजी आत्मचरित्र ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता. राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता असं विधान केले.
पुढे बोलताना पवार यांनी ‘या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही असं विधान केले.
दरम्यान, पुढे बोलताना ‘नारायण राणे यांना नेतृत्व करायला देऊ असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं आश्वासन दिलं हे लक्षात ठेवायचं असतं. काँग्रेसमध्ये असे निर्णय होत नाहीत. काँग्रेसमध्ये आल्यावर चार पाच महिन्यात काही घडेल, अशी अपेक्षा ठेऊ नका, असा सल्ला मी त्यांना तेव्हाच दिला होता’ असंही पवार म्हणाले.
- #Article370 : ‘या’ कारणामुळे शरद पवार होते सभागृहात गैरहजर
- चिंता करू नका, शासन नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्तांना दिलासा
- मूर्खांच्या स्वर्गात राहू नका, आपल्याला कोणीही पाठींबा देणार नाही : पाकिस्तान
- यंदा आघाडीच्या जागा दुप्पट करू : बाळासाहेब थोरात


